spot_img
महाराष्ट्रनिवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत केले मोठे बदल ; ईव्हीएमच्या मतमोजणीसंबंधी घेतला निर्णय

निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत केले मोठे बदल ; ईव्हीएमच्या मतमोजणीसंबंधी घेतला निर्णय

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
भारतीय निवडणूक आयोगाने देशातील आगामी निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने आता पोस्टल मतपत्रिका मोजण्याचे नियम बदलले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मोजणीचा दुसरा अंतिम टप्पा आता पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे.

आयोगाच्या निर्णया अगोदर पोस्टल मतपत्रिका मोजणीपूर्वी ईव्हीएम मोजणी संपवू शकत होती. पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी हा बदल करण्यात आला होता.मतदानाच्या दिवशी, पोस्टल मतपत्रिका मोजणी सकाळी ८:०० वाजता सुरू होते आणि ईव्हीएम मोजणी सकाळी ८:३० वाजता सुरू होते.

पूर्वी, पोस्टल मतपत्रिका मोजणीच्या कोणत्याही टप्प्यावर ईव्हीएम मोजणी सुरू ठेवता येत होती आणि पोस्टल मतपत्रिका मोजणीपूर्वी ती पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आयोगाने आता निर्णय घेतला आहे की पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम/व्हीव्हीपीएटी मोजणीचा दुसरा अंतिम टप्पा सुरू होणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेत एकरूपता आणि अत्यंत स्पष्टता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असे आयोगाने म्हटले आहे. हे विशेषतः ज्या मतमोजणी केंद्रांवर पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातात त्यांना लागू होईल. या बदलामुळे सर्व मते अचूकपणे आणि कोणत्याही गोंधळाशिवाय मोजली जातील याची खात्री होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा...

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...