spot_img
महाराष्ट्रनिवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत केले मोठे बदल ; ईव्हीएमच्या मतमोजणीसंबंधी घेतला निर्णय

निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत केले मोठे बदल ; ईव्हीएमच्या मतमोजणीसंबंधी घेतला निर्णय

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
भारतीय निवडणूक आयोगाने देशातील आगामी निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने आता पोस्टल मतपत्रिका मोजण्याचे नियम बदलले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मोजणीचा दुसरा अंतिम टप्पा आता पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे.

आयोगाच्या निर्णया अगोदर पोस्टल मतपत्रिका मोजणीपूर्वी ईव्हीएम मोजणी संपवू शकत होती. पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी हा बदल करण्यात आला होता.मतदानाच्या दिवशी, पोस्टल मतपत्रिका मोजणी सकाळी ८:०० वाजता सुरू होते आणि ईव्हीएम मोजणी सकाळी ८:३० वाजता सुरू होते.

पूर्वी, पोस्टल मतपत्रिका मोजणीच्या कोणत्याही टप्प्यावर ईव्हीएम मोजणी सुरू ठेवता येत होती आणि पोस्टल मतपत्रिका मोजणीपूर्वी ती पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आयोगाने आता निर्णय घेतला आहे की पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम/व्हीव्हीपीएटी मोजणीचा दुसरा अंतिम टप्पा सुरू होणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेत एकरूपता आणि अत्यंत स्पष्टता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असे आयोगाने म्हटले आहे. हे विशेषतः ज्या मतमोजणी केंद्रांवर पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातात त्यांना लागू होईल. या बदलामुळे सर्व मते अचूकपणे आणि कोणत्याही गोंधळाशिवाय मोजली जातील याची खात्री होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जीएसटी सवलतीबद्दल पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव मनपाने करावा

शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र...

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत; डॉ. सुजय विखे पाटील

लोणी बुद्रुक, हणमंतगाव, पाथरे परिसरातील नुकसानीची डॉ. सुजय विखे यांच्याकडून पाहणी लोणी | नगर सह्याद्री जिल्ह्यात...

‘लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या व्यक्तीचा दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न’

बीड / नगर सह्याद्री - ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय सहकारी पवन कंवर...

पूर परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या, एमपीएससीच्या परीक्षा….

नागपूर: मराठवाडा परिसरात गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे....