spot_img
देशप्रसिद्ध मंदिरात भिंत कोसळून आठ भाविकांचा मृत्यू अनेक जखमी, कारण समोर

प्रसिद्ध मंदिरात भिंत कोसळून आठ भाविकांचा मृत्यू अनेक जखमी, कारण समोर

spot_img

विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर सिंहाचलम येथे भीषण अपघात झाला आहे. मंदिराजवळील सिमेंटची भिंत अचानक कोसळल्याने 8 भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. 300 रुपयांच्या तिकीट लाइनमध्ये उभे राहून भाविक मंदिराकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि भिंतीचा पाया कमकुवत झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. सिंहगिरी बसस्थानकापासून वर जाताना मंदिराला लागून असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील ही भिंत होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

राज्याचे गृहमंत्री व्ही. अनिथा, विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुसळधार पावसामुळे माती ओली झाली, त्यामुळे भिंत कोसळल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रीय आपत्ती दल (NDRF) आणि राज्य आपत्ती दल (SDRF) च्या टीम बचाव कार्यात गुंतल्या आहेत. याशिवाय, अग्निशमन दल आणि पोलीस दलही मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक भाविक अडकले असावेत, अशी शक्यता आहे. त्यांना वाचवण्यासाठी सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अपघाताचा अहवालही मागवण्यात आला असून नुकसानभरपाईबाबत घोषणा अपेक्षित आहे. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी मंदिरात पोहोचले असताना हा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भारत-पाक तणाव वाढला, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; RAWच्या माजी प्रमुखांवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना मोदी सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा...

नगरमध्ये बसस्थानकावर दोघा भावांवर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडल पहा

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - वाटेफळ (ता. अहिल्यानगर) येथील सर्विस रस्त्यावरील बस स्थानकावर रविवारी (27...

शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

बीड / नगर सह्याद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं...

भयंकर…! चौथी मुलगी झाल्याने आई बनली हैवान; बाळा सोबत केले नको ते…

नगर सह्याद्री वेब टीम : डहाणू शहरातील लोणीपाडा येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे....