spot_img
अहमदनगररखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

spot_img

मुंबई । नगर । सहयाद्री:-
देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. एकीकडे सूर्य आग ओकत आहे, तर दुसरीकडे काही भागांमध्ये अचानक पावसाने हजेरी लावली आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिक संभ्रमात आहेत, आणि आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये अचानक पावसाची नोंद झाली, ज्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली. तथापि, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, हा दिलासा तात्पुरता आहे, आणि ओडिशा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 14 ते 18 मार्च दरम्यान तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढत असून, विशेषतः विदर्भ क्षेत्रात ती अधिक जाणवते. ब्रह्मपुरीत तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर चंद्रपूर, अकोला, नागपूर आणि वर्धामध्ये तापमान आणखी 1 ते 2 अंशांनी वाढण्याचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे, आणि नागरिकांना भर उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी गारवा जाणवत असला, तरी दिवसा तापमानाचा स्तर चांगलाच वाढत आहे.

दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर उष्णतेची लाट कायम आहे. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचे आणि आरोग्याच्या दृष्टीने सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...