spot_img
महाराष्ट्र..आता शेजार्‍यांच्या प्रेमात पडू नका!, सुजय विखे विरोधकांवर बरसले

..आता शेजार्‍यांच्या प्रेमात पडू नका!, सुजय विखे विरोधकांवर बरसले

spot_img

Ahilyanagar Politics News: निळवंडेचे पाणी येणार नाही अशी टीका करणार्‍यांना प्रत्यक्ष पाझर तलावामध्ये पाणी आणून उत्तर दिले आहे. जोपर्यंत निळवंडेचे पाणी येत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही हा आपला संकल्प होता आणि तो आता पूर्ण झाला आहे. या भागाचे वातावरण पाहून काहीजण इकडे आले परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. येथील जनतेने विकासाला आणि पाणी देणार्‍या नेतृत्वाला अर्थात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना आठव्यांदा मतदान करून उत्तर दिले आहे. पाणी आल्याने जिरायत भाग समृध्द झाला आहे. ज्यांनी विखेंना विरोध केला, त्यांना त्यांची चूक समजली आहे. त्यामुळे तेही आपल्यासोबत येत आहेत. आपण जे ठरतो तेच करतो आता शेजार्‍यांच्या प्रेमात पडू नका, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे, डोर्‍हाळे वाळकी येथील निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलाव्याच्या जलपूजन प्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, निळवंडे कालव्यांची कामे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्यामुळेच पूर्ण झाली आहे.

कालव्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पाणी आपल्याला उपलब्ध झाले आहे. ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 150 फूट चढ असताना पाणी या गावांना मिळाले. निळवंडेचे पाणी प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. 40 वर्ष संघर्ष केला त्याला आता यश आले आहे. या पाण्याचा उपयोग शेती उत्पादन वाढवण्यासाठी करा. पाण्यावरून कायमच टीका होत गेली, पाणी आल्याने या टीकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री विखे पाटील हे शब्द पूर्ण करणारे नेते आहेत.

आम्ही आपल्यासोबत आहोत असे वातावरण या भागात होत आहे. शिर्डी मतदार संघ कायमच विखे पाटलांबरोबर राहिलेला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असताना भविष्यामध्ये 25 वर्षांचा विचार करून शिर्डी मतदार संघाची बांधणी करणार असल्याचे सांगून शिर्डी एमआयडीसीमध्ये टाटा उद्योग समुहाच्या माध्यमातून 167 कोटींचा प्रकल्प, शासकीय आयटीआय बायपासचे चौपदरीकरण, रोजगार निर्मिती, ऊस शेतीच्या माध्यमातून या भागाला समृद्धी देता येणार आहे. जनतेच्या विकासासाठी विखे परिवार कायमच कटीबद्ध असल्याची ग्वाही देत, शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आदर्श शिर्डीकरिता गुन्हेगारी मुक्त शिर्डी हा आपला संकल्प आहे तो पूर्णच करणार आहोत.

निळवंडे पाणी प्रश्न सोडवावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेलो. आज जलसंपदा खाते काय करू शकते हे मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष कामातून विरोधकांना दाखवून दिले आहे. या परिसरातील विखे पाटलांच्या अनेक विरोधकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करत आम्ही आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही यानिमित्ताने दिली. गावोगावी नागरिकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.या काही दिवसांपूर्वी या परिसरात लहान मुलांची जी दुर्घटना घडली या दोघांनाही विखे पाटील परिवाराच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटलांसोबत ज्या कार्यकर्त्यांनी काम केले, प्रसंगी आपल्या जमिनी दिल्या त्यावर तळे उभारले गेले. त्यात पाणी त्यांच्या मुलांनी सोडले आणि नारळ फोडण्यासाठी आज त्यांचा नातू असा तीन पिढ्यांचा पाण्याचा प्रवास आज अखेर संपला. त्या काळात दिलेल्या जमिनी त्यात झालेले तळे आणि त्या तळ्यामध्ये अखेर आज निळवंडेचे पाणी साचले ही खरी स्व.बाळासाहेब विखे पाटलांना श्रद्धांजली ठरेल.
-डॉ. सुजय विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढील चोवीस तासांत ठेवीदारांचे पैसे द्या, आम्ही पाठिंबा द्यायला तयार!

गोरेश्वर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख बाबासाहेब तांबे यांचा विरोधकांवर हल्लाबोल पारनेर | नगर सह्याद्री पतसंस्था...

जीममध्ये भयंकर घटना! तरुणाला फरशीवर आपटले, कारण काय?

जामखेड । नगर सहयाद्री:- जीममध्ये तु उशिरा का आलास असे म्हणत एकास जीममध्येच उचलुन...

‘जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची हिवरेबाजारला भेट’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिवरेबाजार येथे गुरुवार 05 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ‌‘एक...

पारनेरकरांना खुशखबर! आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश; या कामांसाठी 20 कोटी…

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ धरणाच्या डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण...