spot_img
अहमदनगरMaharashtra Politics : 'तुम्ही' फेक न्यूजची फॅक्टरी चालवता का?; आमदार थोरातांचा महायुतीवर...

Maharashtra Politics : ‘तुम्ही’ फेक न्यूजची फॅक्टरी चालवता का?; आमदार थोरातांचा महायुतीवर हल्लाबोल, वाचा सविस्तर..

spot_img

Maharashtra Politics : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर फेक न्यूजवरून हल्लाबोल केला आहे. तुम्ही फेक न्यूजची फॅक्टरी चालवता का? असा सवाल करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सातत्याने खोट्या बातम्या पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करणं. एवढं एकच काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ करत असल्याची टीका देखील माजी महसूल मंत्री थोरात यांनी केली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या × सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का ? सातत्याने खोट्या बातम्या पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करणे एवढेच एकच काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ करत आहेत.

https://x.com/bb_thorat/status/1835185136620466583?

अगोदर राहुल गांधींनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलेच नाही त्याबद्दल फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी केली आणि आता कर्नाटकात जे घडलेच नाही त्याबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील जनता सुज्ञ असून तुमच्या फेक नॅरेटीव्ह सोबत तुमचेही सरकारही उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा माजी महसूल मंत्री थोरात यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...