spot_img
ब्रेकिंगमुला-मुलींच्या संपत्तीवर आई-वडिलांचा हक्क असतो का?, कायदा काय सांगतो!

मुला-मुलींच्या संपत्तीवर आई-वडिलांचा हक्क असतो का?, कायदा काय सांगतो!

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम:-
भारतात मालमत्तेवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीवरून वाद होतात. भारतीय कायद्यानुसार, आई-वडिलांच्या संपत्तीत मुला-मुलींना समान अधिकार आहेत. अविवाहित तसेच विवाहित मुलींनाही आई-वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मिळतो. भारतीय कायद्यात मुला-मुलींच्या संपत्तीत आई-वडिलांना विशिष्ट परिस्थितीत अधिकार मिळण्याची तरतूद आहे.

हिंदू उत्तराधिकार कायदाच्या कलम 8 नुसार, पालकांना मुलाच्या मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार मिळतो. मुलगा अविवाहितअसताना त्याचा मृत्यू झाल्यास आणि त्याने मृत्यूपत्र केलेले नसल्यास, पालकांना त्याच्या संपत्तीवर अधिकार मिळतो. अपघात किंवा गंभीर आजारामुळे मुलाचा मृत्यू झाल्यास, पालक त्याच्या मालमत्तेवर दावा करू शकतात. आई आणि वडील दोघेही हयात असल्यास, आईला संपत्तीवर पहिला हक्क मिळतो, तर वडिलांना दुसरा हक्क मिळतो.

आई हयात नसल्यास, वडिलांना मालमत्तेवर हक्क मिळतो आणि मालमत्ता वडील आणि इतर कुटुंबीयांमध्ये विभागली जाते. वारसदारांची संख्या जास्त असल्यास, वडील आणि इतर वारस समान भागीदार मानले जातात. मुलगा विवाहित असल्यास आणि मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास, त्याच्या पत्नीचा संपत्तीवर पहिला हक्क असतो, तर पालकांचा दुसरा हक्क असतो.मुलगी अविवाहित असल्यास, तिच्या संपत्तीचा हक्क पालकांकडे जातो. मुलगी विवाहित असल्यास, तिच्या मुलांना आणि पतीला संपत्तीचा अधिकार मिळतो. मुलीला अपत्य नसल्यास, तिच्या पतीला पहिला हक्क मिळतो आणि पालकांना दुसरा हक्क मिळतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...