spot_img
ब्रेकिंगमुला-मुलींच्या संपत्तीवर आई-वडिलांचा हक्क असतो का?, कायदा काय सांगतो!

मुला-मुलींच्या संपत्तीवर आई-वडिलांचा हक्क असतो का?, कायदा काय सांगतो!

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम:-
भारतात मालमत्तेवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीवरून वाद होतात. भारतीय कायद्यानुसार, आई-वडिलांच्या संपत्तीत मुला-मुलींना समान अधिकार आहेत. अविवाहित तसेच विवाहित मुलींनाही आई-वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मिळतो. भारतीय कायद्यात मुला-मुलींच्या संपत्तीत आई-वडिलांना विशिष्ट परिस्थितीत अधिकार मिळण्याची तरतूद आहे.

हिंदू उत्तराधिकार कायदाच्या कलम 8 नुसार, पालकांना मुलाच्या मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार मिळतो. मुलगा अविवाहितअसताना त्याचा मृत्यू झाल्यास आणि त्याने मृत्यूपत्र केलेले नसल्यास, पालकांना त्याच्या संपत्तीवर अधिकार मिळतो. अपघात किंवा गंभीर आजारामुळे मुलाचा मृत्यू झाल्यास, पालक त्याच्या मालमत्तेवर दावा करू शकतात. आई आणि वडील दोघेही हयात असल्यास, आईला संपत्तीवर पहिला हक्क मिळतो, तर वडिलांना दुसरा हक्क मिळतो.

आई हयात नसल्यास, वडिलांना मालमत्तेवर हक्क मिळतो आणि मालमत्ता वडील आणि इतर कुटुंबीयांमध्ये विभागली जाते. वारसदारांची संख्या जास्त असल्यास, वडील आणि इतर वारस समान भागीदार मानले जातात. मुलगा विवाहित असल्यास आणि मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास, त्याच्या पत्नीचा संपत्तीवर पहिला हक्क असतो, तर पालकांचा दुसरा हक्क असतो.मुलगी अविवाहित असल्यास, तिच्या संपत्तीचा हक्क पालकांकडे जातो. मुलगी विवाहित असल्यास, तिच्या मुलांना आणि पतीला संपत्तीचा अधिकार मिळतो. मुलीला अपत्य नसल्यास, तिच्या पतीला पहिला हक्क मिळतो आणि पालकांना दुसरा हक्क मिळतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...