spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गडबड? राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गडबड? राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर

spot_img

Maharashtra Politics News: काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात आमचं मतदान कमी झालेलं नाही. परंतु भाजपचं मतदान वाढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधींच्या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना म्हटलं की, महाराष्ट्रात मागील ५ वर्षांत ३२ लाख मतदारांना जोडले गेले. पण २०२४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ३९ लाख मतदार कसे जोडले? विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक इतके मतदार कुठून आले? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मतदारांची नवीन आकडेवारी निवडणूक आयोगाने दिलेली आहे. निवडणूक आयोगाने किती मतदार वाढले आणि कुठे हे सांगितलंय. दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार आहे. त्यामुळे कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न राहुल गांधी कडून केला जात आहे. ते आत्मचिंतन करणार नाहीत, खोट्या मनाची समजूत करून घेतील. तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही.

राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. आठ तारखेला येणाऱ्या दिल्लीचा निकाल आल्यावर त्यांच्या पक्षाचं नाव संपणार आहे. त्यामुळे राहुल गांधी त्यादिवशी काय बोलणार म्हणून त्याचा सराव आतापासून करत आहेत. राहुल गांधी यांनी आता आत्मचिंतन करावं, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...