spot_img
अहमदनगरसाळवण देवी रोडच्या कडेला घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात...

साळवण देवी रोडच्या कडेला घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

spot_img

श्रीगोंदा / नगर सह्याद्री

स्वच्छ भारत … स्वच्छ शहर ‘चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहरात स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र श्रीगोंदा शहरातील साळवण देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एकीकडे रोगराईची धास्ती आणि शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात रोगराई पसरण्याची भीती नागरीकांमध्ये वाटत आहे. साळवन देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची लेखी तक्रार श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले.

याबाबत सागर कोथिंबिरे (शहर उपाध्यक्ष, रा.कॉ.) यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की श्रीगोंदा साळवन देवी रोडवर मच्छी चिकन मार्केटच्या मागील बाजूस येथील दुकानदार चिकन आणि मच्छीचे अवशेष फेकून देत असल्याने रस्त्यावर बाजूला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी क्षेत्र निर्माण झाले असून या रस्त्याने जाणाऱ्या_ येणाऱ्या नागरिकांना व तेथे राहणाऱ्या नागरिकांना घाणीचा प्रादुर्भाव होऊन आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साळवण देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरील दयनीय अवस्था पाहून मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येण्याची शक्यता स्थानिक नागरिक वर्तवत आहेत. तसेच याच रोडवरील पथदिवे बंद असल्याने तेही तात्काळ दुरुस्त करून घेण्यात यावेत असे निवेदनात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...