spot_img
अहमदनगरराजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…‘

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…‘

spot_img

बीड । नगर सहयाद्री:-
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आणखी सहा जणांना अटक झाली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

याप्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात हत्येचे काही फोटो समोर आले, ज्यामुळे राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली. परिणामी, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत गेली आणि अखेर त्यांनी आज (4 मार्च) सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला असून, मी तो स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवला आहे.”

राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपल्या निर्णयावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले, “संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्यापासूनची मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले आहे. माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव पुढील काही दिवस उपचार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. त्यामुळे मी वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.”

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर थोडक्यात प्रतिक्रिया देत म्हटले, “धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. मात्र आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...