पुणे | नगर सह्याद्री
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी राज्यातील 12 लाख 71 हजार 201 विद्याथ्यनी नोंदणी केली आहे. पहिल्या कॅप फेरीचे कनिष्ठ महाविद्यालयांचे कट ऑफ गुरुवारी (दि.26) जाहीर होणार असून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय वाटपही जाहीर होईल. अकरावी प्रवेशासाठी 9 हजार 435 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्याथ प्रवेश क्षमता 21 लाख 23 हजार 720 असून त्यापैकी कॅप फेरी साठी प्रवेश क्षमता 16 लाख 60 हजार 84 तसेच कोटा प्रवेश क्षमता 4 लाख 63 हजार 636 इतकी आहे. 4 जुलैला रिक्त जागा जाहीर झाल्यावर तात्काळ दुसरी प्रवेश फेरीही सुरु होईल. व्यवस्थापन, अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोटा प्रवेश फेरीसाठी 25 जून रोजी सायंकाळी 6 पर्यंत संधी आहे. कॅप फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय निहाय विद्याथ वाटप यादी गुरुवारी जाहीर होईल.
नगरमध्ये अकरावीच्या शेकडो जागा रिक्त राहण्याची शक्यता
इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाकडे ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज व अधिक प्रमाणात उपलब्ध असलेल्या जागा पाहता यंदा 11 वीच्या शेकडो जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिक्त जागांचा फटका कला व वाणिज्य शाखेला बसणार आहे. परिणामी शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाने यंदापासून जिल्ह्यात प्रथमच 11 वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीय पद्धत अवलंबिली आहे. जिल्ह्यात यंदा 10 वी उत्तीर्णांची संख्या 61 हजार 412 आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील 517 कनिष्ठ महाविद्यालयातून 11 वी प्रवेशाच्या 80 हजारावर जागा उपलब्ध आहेत आणि अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने केवळ 52 हजार 232 अर्ज प्राप्त झालेले आहेत.
उपलब्ध जागा अधिक, त्या तुलनेत दहावी उत्तीर्णांची संख्या कमी आणि पुन्हा अकरावी प्रवेशासाठी आलेल्या अर्जांची संख्या त्याहून कमी. यामुळे शेकडो जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दहावी उत्तीर्णनंतर आयटीआय, पदविकांचे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याकडेही विद्याथ प्रवेश घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात अकरावीसाठी अर्ज केलेले असले तरी प्रत्यक्षात किती संख्येने विद्याथ प्रवेश घेणार, त्यावर रिक्त जागांचे प्रमाण ठरेल. तरीही शेकडो जागा रिक्त राहणार आहेत. शिक्षण विभागाच्याच माहितीनुसार जिल्ह्यात अकरावीसह इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण 91 हजार 310 जागा उपलब्ध आहेत.