spot_img
ब्रेकिंगढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात; काय होतोय परिणाम पहा

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात; काय होतोय परिणाम पहा

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
सध्या थंडीचा कडाका कमी होऊन ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम विविध पिकांवर होत आहे. धुकं वाढल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढवून श्रीगोंदा तालुयातील पिके धोयात आली आहे. फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
उत्पादन वाढीच्या शेतकर्‍यांच्या नियोजनाला कायम निसर्गाच्या लहरीपणाचा अडसर ठरलेला आहे. जी स्थिती खरीप हंगामातील पिकांची झाली होती. त्यापेक्षा विदारक अवस्था ही रब्बी हंगामात पहावयास मिळत आहे. सातत्याने होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. तसेच शेतकर्‍यांची मेहनत आणि कष्टही निष्फळ ठरत आहे. रब्बी हंगामातील बदललेल्या पीक पद्धतीमुळे मुख्य पिकांची जागा ही गहू, हरभरा व कांदा पिकाने घेतली आहे. तर याच पिकावर अधिकचा परिणाम झालेला आहे.सध्याच्या वातावरणातील बदलांचा सर्वाधिक फटका कांदा, हरभरा व गहू पिकाला बसत आहे. सकाळचे धुके अन दिवसभर ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषत हरभरा या पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

दरम्यान रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू, कांदा इत्यादी पिके ढगाळ वातावरणामुळे बाधित होताना दिसत आहेत. ज्वारी व हरभर्‍याच्या पिकावर अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांनी या पिकावर विविध प्रकारच्या रोग नियंत्रण फवारणी सुरू केले आहेत. वातावरणातील या चढउतारामुळे रब्बी हंगामातील अनेक पिके बाधित होताना दिसत आहे. श्रीगोंदा तालुयात कांद्याचे विक्रमी लागवड झाली आहे. कांदा पीक हे नगदी पीक असल्याने तीन ते चार महिन्यात हे पीक हाती लागते. सध्या कांद्याला चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक हातभार लागला. त्यामुळे शेतकरी कांदा पिकांकडे मोठ्या प्रमाणात शेती उद्योग करताना दिसत आहेत. परंतु, निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

चांगले पैसे मिळतील या आशेवर शेती
खते, औषधे महाग झाली आहेत. निसर्गाचा लहरीपणा सुरु आहे. शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. कांद्याला सध्या बाजार आहे परंतु, कांदा हातात येईल तेव्हा बाजार राहील की नाही माहित नाही. पिक निघून चांगले पैसे पदरात पडतील या आशेवर शेतीची मेहनत घेतली जात आहे. शेती पिकविणे शेतकर्‍याच्या हातात आहे परंतु, बाजार भावाचे हातात नाही असे श्रीगोंद्यातील शेतरी सतीश पाडळे यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना सांगितले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...