spot_img
महाराष्ट्रमहायुतीमधील कलह चव्हाट्यावर; धस अजित पवार गटावर बरसले

महायुतीमधील कलह चव्हाट्यावर; धस अजित पवार गटावर बरसले

spot_img

बीड | नगर सह्याद्री

बीडच्या आष्टीत महायुतीत वादाची ठिणगी उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ’पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत… दाल मे कुछ तो काला है’, असे म्हणत बीडच्या आष्टी मतदासंघाचे भाजप उमेदवार सुरेश धस यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी आता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत, असे वक्तव्य सुरेश धस यांनी भर प्रचारसभेत केले आहे. त्यांच्या या टीकेमुळे जोरदार चर्चा होत आहे. सुरेश धस हे आष्टी मतदारसंघातील महायुतीमधल भाजपचे उमेदवार आहेत. आष्टी मतदारसंघामध्ये मंगळवारी त्यांची सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी अजित पवार गटावर टीका केली.

सुरेश धस यांनी सांगितले की, ’महायुतीचा उमेदवार म्हणून मला घोषीत केले आणि ऐनवेळी घड्याळाचा एबी फॉर्म येतो आणि ते सुद्धा ऐवढ्या जोरात सांगतात की एबी फॉर्म आला. जसं काय डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाचा फॉर्म आलाय. पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजलेत. लोकांची भावना मोठ्या पवारांकडे आहे. छोट्या पवारांकडे नकारात्मक भावना आहे.’ तसंच,’मग आतून नेमकं चाललंय काय? दाल मे कुछ तो काला है… हे कोणी केलं? घड्याळ चिन्ह दिले गेले, कमळाला रोखण्यासाठी? आणि हे जे केले तर प्रचार सुरु केला. मी तर म्हटलं होतं बिगर चिन्हाची निवडणूक घ्या.’, असे म्हणत सुरेश धस यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. सुरेश धस यांच्या या निर्णयामुळे आणि वक्तव्यावरून बीडमध्ये महायुतीतील वाद चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...