spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! कार्यालयातच आयुक्तांना अरेरावी, राष्ट्रवादीचा कडक इशारा

धक्कादायक! कार्यालयातच आयुक्तांना अरेरावी, राष्ट्रवादीचा कडक इशारा

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घटनेचा निषेध | धडा शिकवण्याचा दिला इशारा
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांना कार्यालयामध्ये काही लोकांनी अरेरावी करत धिंगाणा घालण्याचे काम केले आहे. ही घटना निषेधार्थ असून भविष्यात कोणी अशा प्रकारचे वर्तन केल्यास त्याला धडा शिकवला जाईल. तसेच हिंदुत्ववादी संघटना अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी व्यक्त केली.

अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांना काही लोकांनी अरेरावी व धिंगाणा घातल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेत आयुक्तांची भेट घेऊन तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून अनधिकृत कत्तलखाने पाडल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, दीपक खेडकर, भाऊ बारस्कर, गणेश बोरुडे, सतीश ढवण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र अशा पद्धतीने हातवारे करणे धिंगाणा घालणे हे चुकीचे आहे. तरी सर्वांनी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. अनधिकृत कत्तलखाने महापालिका प्रशासक यशवंत डांगे यांनी पाडले. या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन यापूव अशी कारवाई कधीही झाली नव्हती असे ते म्हणाले.

माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहरांमध्ये शहरी विकासाची कामे सुरू आहे. रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे करीत असताना यामध्ये थडगे अथवा धार्मिक स्थळे येत असून त्याची अतिक्रमणे तातडीने काढावीत व वाहतुकीचा प्रश्न माग लावावा असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था राज्यातील पूरग्रस्त पीडित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांपासून ते अनेक...

महाराष्ट्रात अस्मानी संकट, फडणवीसांचा दिल्ली दौरा, पंतप्रधानांचे मोठे आश्वासन?

नवी दिल्ली / नगर सह्याद्री - राज्यावर मोठं संकट कोसळलं आहे, महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस झाला...

मोहटा देवी यात्रा; विखेंचा लंकेंना टोला! काय म्हणाले पहा…

पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यावर यात्रा बंद करतात: सुजय विखे...

केडगावमध्ये भाईगिरीचा थरार!, तरुणावर धारदार शस्राने वार, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव परिसरात दोन दिवसांपूव झालेल्या किरकोळ वादाचा जाब विचारल्याच्या रागातून...