spot_img
अहमदनगरनागरिकांचा महानगरपालिकेत ठिय्या; नेमकी मागणी काय?

नागरिकांचा महानगरपालिकेत ठिय्या; नेमकी मागणी काय?

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
शहरात सगळीकडे अतिक्रमण काढण्याची जोरदार मोहीम सुरु आहे, मात्र स्टेशन परिसरातील वहिवाटीच्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबत वेळोवेळी पुरावे सादर करून देखील महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अनधिकृत बांधकामावर कधी कारवाई करणार? असा सवाल करत महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले.

यावेळी सचिन बनसोडे, कैलास कावळे, राहुल आंबटकर, मनोज कावळे, देविदास बनसोडे, प्रतीक बनसोडे, करण वाव्हळ, राजू आंबेडकर, अशोक आंबटकर, दुर्गा कावळे, दिपाली बनसोडे, अंजना बनसोडे, श्रद्धा कावळे, मीरा वाव्हळ आदी उपस्थित होते. सर्वे नंबर ४८ मधील वहिवाटीचा रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबत रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले होते. निवेदनाद्वारे आशा अशोक गाडीलकर, अक्षय अशोक गाडीलकर, व इतर यांनी अनधिकृत बांधकाम करत बेकायदेशीर भाडेकरु देखील टाकले आहे. हे वहिवाटीच्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी मागणी कला होती.

त्यावर प्रभाग समिती क्रमांक चार यांनी नोटीस देऊन वरील अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून 30 दिवसाच्या आदी काढण्याचे सांगितले होते. परंतु त्या गोष्टीला तीन ते चार महिने उलटून गेले आहेत तरी देखील यांनी हे अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे स्टेशन परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करत परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करावी, तसेच रस्त्याचा श्वास मोकळा करावा अशी मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...