spot_img
ब्रेकिंगजल्लोष करून ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ला नगरकरांची मानवंदना

जल्लोष करून ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ला नगरकरांची मानवंदना

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारताने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.अहिल्यानगर येथील तिरंगा फाउंडेशन, राजे ग्रुप, वाडिया मॉर्निंग ग्रुप व सुप्रभात ग्रुप कडून भारतीय सैन्याचे कौतुक करत फटाके फोडून, तिरंगा फडकवून मोठा जल्लोष करण्यात आला.

लोकमान्य टिळक रस्त्यावर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी हा जल्लोष करण्यात आला. यावेळी नगर शहरातील तरुण भारत माता की जय,.पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत भारतीय सैनिकांचे आत्मबल वाढविले. काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल बोलताना संभाजी कदम म्हणाले की भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लष्करे तोयबा, जैश ए मोहंमंद सारख्या अतिरेक्यांच्या अंड्यांवर मिसाईल ने हल्ले करून ती नेस्तनाबूद करण्यात आली व जशास तसे उत्तर अतिरेक्यांना देण्यात आले. ही बाब भारतीयांना अभिमानाची असून त्याबद्दल भारतीय सेनेचे त्यांनी अभिनंदन केलं.

डॉ. सतीश फडके यांनी देखील भारतीय सेनेचे कौतुक करून सेनेचे अभिनंदन केले. यासाठी दयानंद वाबळे, प्रवीण बेंद्रे, अतुल डागा, संतोष बोथरा, डॉ. सतीश कदम, मनीष सोहनी, योगेश चुत्तर, संतोष तनपुरे, आकाश भन्साळी, अनिल येलमाने, अनिल गुंजाळ, संतोष गाडे, सारंग उदवंत, मनोज जैन, गणेश पालवे, सुभाष काळे, संतोष धोत्रे, शिवाजी शिंदे, नवरत्न डागा यांनी पुढाकार घेतला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भारत कोणाची छेडखानी करत नाही, जर केली तर….; ‘ऑपरेशन सिंदूर’वर अण्णा हजारे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला चढवला....

हवामान खात्याची मोठी अपडेट!, राज्यातील ‘या’ भागात गारपीट होणार?

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातील काही भागांना या...

‘ऑपरेशन सिंदूर’! पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘भारतीय लष्कराचा..’

Operation Sindoor: भारताच्या तिन्ही दलांनी मध्यरात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या...

भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सक्सेस!; ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त, असा ठरला प्लॅन, कोण काय म्हणाले पहा

भारतीय लष्कराचा दहतशवाद्यांच्या मुळावरच घाव नवी दिल्ली | नगर सह्याद्री पाकिस्तानात कटकारस्थान रचून भारतात रक्तपात घडवणाऱ्या...