spot_img
अहमदनगरकूकडी डावा कालव्याचे आवर्तन सुटले!; आ. दाते सर यांच्या पाठपुराव्याला यश

कूकडी डावा कालव्याचे आवर्तन सुटले!; आ. दाते सर यांच्या पाठपुराव्याला यश

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
कुकडी डावा कालव्यातून रविवारी दुपारी पाणी सोडण्यात आले असून पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी पोहचले आहे. या आवर्तनामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्न तात्काळ प्रश्न मार्गी लावल्याने निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

कुकडी कालव्याच्या लाभ क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे चारा पिके, फळबाग, इतर शेतीमाल जळण्याची भीती निर्माण झाली होती यामुळे आमदार काशिनाथ दाते सर यांनी ठरलेल्या आवर्तनाच्या पाच दिवस अगोदर पाणी सोडावे अशी आग्रही मागणी आ. काशिनाथ दाते सर यांनी शेतकऱ्यांचे मागणी प्रमाणे कार्यवाही व्हावी म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.

आमदार दाते सर यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी तात्काळ कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांना आवर्तन सोडण्याचा आदेश त्यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी ( दि १६ ) रोजी आवर्तन सोडण्यात आले आहे. शेतकर्‍यांना या आवर्तनाचा गरजेच्या वेळी सुटलेले असून अगोदर आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष व निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन वराळ पाटील यांनी पाणी सोडल्याबद्दल आनंद व्यक्त करीत संबधीतांचे आभार मानीत धन्यवाद व्यक्त केले आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते सर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखीले यांनी सातत्याने विकासाभिमुख भुमिका घेऊन पाण्याच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याची माहिती वराळ पाटील यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...