spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये सिनेस्टाईल थरार, पहिल्या पतीचा घटस्फोटीत पत्नीवर गोळीबार! कुठे घडली घटना? पहा..

अहमदनगरमध्ये सिनेस्टाईल थरार, पहिल्या पतीचा घटस्फोटीत पत्नीवर गोळीबार! कुठे घडली घटना? पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
घटस्फोट दिलेल्या पत्नीच्या दुसऱ्या विवाहाला पंधरा दिवस झाले नाही, तोच तिच्या सासरी जाऊन पहिल्या पतीने गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात महिलेचा सासरा गंभीर जखमी झाला आहे. तालुक्यातील हत्राळ येथे बुधवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. माणिक सुखदेव केदार (वय ५५) असे जखमीचे नाव असून, आरोपी सुभाष विष्णू बडे (वय ३०, रा. वेळी, पाथर्डी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी: पाथर्डीपासून आठ किलोमीटरवर असेलेल्या हत्राळ येथे माणिक सुखदेव केदार (वय ५५) व त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.ते रात्री आठच्या सुमारास जेवण करत असताना सुभाष विष्णू बडे तेथे आला व त्याने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. ती गोळी केदार यांच्या डाव्या बरगडीच्या वर लागली. त्यामुळे केदार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गोळी शरीरातच असल्याने त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

दरम्यान, आरोपी बडे याला गावातील ग्रामस्थांनी चोप देऊन बांधून ठेवले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मारहाण झाल्याने आरोपी सुभाष बडे जखमी झाल्याचे समजते. घटस्फोटित पत्नीने दुसरा विवाह केल्याच्या रागातून बडे गाने तिच्यावरच गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असावा मात्र ती गोजी केदार यांना लागली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....