spot_img
अहमदनगरमुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक आहिल्यानगर जिल्ह्याला भेट; कारण आलं समोर..

मुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक आहिल्यानगर जिल्ह्याला भेट; कारण आलं समोर..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
दिलेला शब्द पाळत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यातील संवेदनशीलतेचा परिचय दिला. त्यांनी रविवारी कोपर्डी घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावली. नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या टाकळी हाजी या गावात रविवारी दुपारी हा साधा विवाह सोहळा झाला.

कोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातील मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला. सोयीचे ठिकाण म्हणून लग्न शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे पार पडले. सुद्रिक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते. त्यांनी यायचे कबुल केले होते.

मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कारभारही सुरू केला. मात्र, लग्नाला येतो, असा शब्द त्यांनी दिला होता. तो त्यांनी पाळला आणि लग्न समारंभाला फौजफाट्याह हजेरी लावत सर्वांना सुखद धक्का दिला.

यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. आपल्याला या विवाहाचे निमंत्रण होते, त्यामुळे येथे येऊन वधू-वरांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही कुटुंबाला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर, पण कोट्यवधी कमावले! गुजरात टायटन्सलाही लागली लॉटरी

नगर सह्याद्री वेब टीम मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर २ मधून...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून सरकारला….

राज्य निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेबाबत सुचना मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,...

अहिल्यानगर जिल्हा गोळीबाराने हादरला; भीमराज आव्हाडांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत...

नगर शहर हादरलं! युवकांवर गोळीबार; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत...