spot_img
ब्रेकिंगRain update: हिवाळ्यातही पावसाची शक्यता! भारतीय हवामानशास्त्र विभागाचा 'असा' अंदाज

Rain update: हिवाळ्यातही पावसाची शक्यता! भारतीय हवामानशास्त्र विभागाचा ‘असा’ अंदाज

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
जानेवारी ते मार्च या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. जानेवारीमध्ये राज्यात किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे. चालू हंगामात राज्यात अद्याप थंडीच्या लाटेचा अनुभव आला नसताना जानेवारीतही हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

आयएमडीतर्फे सोमवारी आगामी हिवाळी हंगामातील पाऊस आणि जानेवारीच्या तापमानाचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार देशभरात जानेवारी ते मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता वर्तवली आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, मध्य भारतासह महाराष्ट्रात आगामी तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता ७५ टक्के आहे. जानेवारीत देशाच्या बहुतांश भागांत रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शयता आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शयता ६५ टक्के आहे.

थंडीची जाणीव होण्यासाठी किमान तापमानासोबतच कमाल तापमानाचाही पारा उतरण्याची गरज असते. यंदा डिसेंबरमध्ये थंडीने हुलकावणी दिल्यानंतर जानेवारीमध्येही थंडी फारशी अनुभवायला मिळणार नाही, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण विभागात किमान तापमान सरासरीहून अधिक असू शकते. या काळात केवळ किमान नाही तर कमाल तापमानही अधिक असू शकेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीहून किंचित कमी असू शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...