spot_img
ब्रेकिंगRain update: हिवाळ्यातही पावसाची शक्यता! भारतीय हवामानशास्त्र विभागाचा 'असा' अंदाज

Rain update: हिवाळ्यातही पावसाची शक्यता! भारतीय हवामानशास्त्र विभागाचा ‘असा’ अंदाज

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
जानेवारी ते मार्च या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. जानेवारीमध्ये राज्यात किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे. चालू हंगामात राज्यात अद्याप थंडीच्या लाटेचा अनुभव आला नसताना जानेवारीतही हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

आयएमडीतर्फे सोमवारी आगामी हिवाळी हंगामातील पाऊस आणि जानेवारीच्या तापमानाचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार देशभरात जानेवारी ते मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता वर्तवली आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, मध्य भारतासह महाराष्ट्रात आगामी तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता ७५ टक्के आहे. जानेवारीत देशाच्या बहुतांश भागांत रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शयता आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शयता ६५ टक्के आहे.

थंडीची जाणीव होण्यासाठी किमान तापमानासोबतच कमाल तापमानाचाही पारा उतरण्याची गरज असते. यंदा डिसेंबरमध्ये थंडीने हुलकावणी दिल्यानंतर जानेवारीमध्येही थंडी फारशी अनुभवायला मिळणार नाही, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण विभागात किमान तापमान सरासरीहून अधिक असू शकते. या काळात केवळ किमान नाही तर कमाल तापमानही अधिक असू शकेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीहून किंचित कमी असू शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...