spot_img
महाराष्ट्रChagan Bhujbal : हा अध्यादेश नव्हे केवळ मसुदा, कोर्टात जाणार..छगन भुजबळांची पहिली...

Chagan Bhujbal : हा अध्यादेश नव्हे केवळ मसुदा, कोर्टात जाणार..छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, पहाच

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्याचा आनंदोत्सव एकीकडे समाज करत असताना आता मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले आहेत की, मराठा समाजाचा विजय झाला असं मला वाटत नाही. झुंडशाहीने नियम, कायदे बदलता येत नसतात असे ते म्हणाले.

सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आणि इतर समाजातील वकील असतील त्यांनी याचा अभ्यास करुन यावर हरकती लाखोंच्या संख्येने पाठवाव्यात. जेणेकरुन सरकारला लक्षात येईल ही याबाबत दुसरीही बाजू आहे, असं ते म्हणाले.

सर्व सगेसोयरे कायद्याच्या चौकटीत टिकतील असं मला वाटत नाही. मला मराठ्यांना निदर्शनास आणून द्यायचं आहे की तुम्हाला जिंकलात असं वाटतंय. पण, आरक्षणामध्ये आता ८० टक्के लोक येतील. आता तुम्हाला ईबीसीमध्ये १० टक्के आरक्षण मिळत होतं, आता ते यापुढे मिळणार नाही तसेच

ओपनमधून ४० टक्क्यांमध्ये तुम्हाला आरक्षण मिळत होतं. आता या पन्नास टक्क्यांमध्ये कोणीच नाही. मराठ्यांना यावर पाणी सोडावं लागेल आणि इतर आरक्षणात असलेल्या जातींसोबत तुम्हाला झगडावं लागणार आहे. जात जन्माने येते, एखाद्याच्या शपथपत्राने जात येते का? १०० रुपयांचा बाँड देऊन जात मिळवता येत नाही, अशी भूमिका भुजबळांनी घेतली.

सरकारने काढलेला अध्यादेश नसून तो एक मसुदा आहे. त्याच्यावर हरकती मागवल्या असून आता त्यावर आमचा अभ्यास सुरु असेल. त्यानंतर कोर्टामध्ये जाण्यात येईल. उद्या दुसरं कोणी लाखो लोकं घेऊन येईल. त्यांना देखील हवं तसं आरक्षण देणार का, असा सवाल भुजबळांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

७ वर्षांनंतर जयंत पाटलांचा मोठा निर्णय! ‘मला ‘या’ जबाबदारीतून मुक्त करा’; शरद पवारांना केली विनंती

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित...

9 टक्क्यांचे आमिष, ‘ईतक्या’ लाखांची फसवणूक!, चेरमन संदीप थोरातच्या संस्थेत मोठा आर्थिक गोंधळ!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या दरेवाडी (ता. नगर) शाखेत...

गोरेश्वरमध्ये बाजीराव पानमंद यांचीच सत्ता

भाळवणी, ढवळपुरीमधून पानमंद यांना मोठी आघाडी | बाबासाहेब तांबे यांच्या पॅनलला भोपळा पारनेर |...

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; कुठं कुठं पडणार?,हवामान खात्याची नवी अपडेट..

Maharashtra Weather: काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. हवामान...