spot_img
अहमदनगरमहंत रामगिरी महाराज यांचे आक्षेपार्ह वक्तव्य; नगरमध्ये शेकडो आंदोलक रस्त्यावर! केली 'मोठी'...

महंत रामगिरी महाराज यांचे आक्षेपार्ह वक्तव्य; नगरमध्ये शेकडो आंदोलक रस्त्यावर! केली ‘मोठी’ मागणी

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात प्रवचना दरम्यान एक धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वक्तव्यामुळे वैजापूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली, जमावाने रात्री आठच्या दरम्यान घोषणाबाजी करत टायर देखील जाळले. सदर प्रकरणामुळे तणाव आणि अस्थिरतेची स्थिती निर्माण झाल्यावर पोलिसांनी आवश्यक तातडीच्या उपाययोजना केल्या असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि चुकीचे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. वैजापूर तालुक्यात 16 ऑगस्ट रात्री 12 ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी घोषित करण्यात आली आहे.

महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप एका धर्माच्या काही समाजाने केला. या विधानामुळे भावना दुखावल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील येवला व मनमाड शहरातही तणावाची स्थिती निर्माण झाली होती अशी माहिती समोर आली आहे.

अहमदनगरमध्ये शेकडो आंदोलक रस्त्यावर
महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. अहमदनगर शहरात शेकडो आंदोलक रस्त्यावर आले. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. अहमदनगर मधील डीएसपी चौकात मोठा जमाव जमला होता. जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! शिर्डीतील साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी

शिर्डी । नगर सहयाद्री:- पहलगाम हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जाणारं देवस्थान...

पोलीस दलात खळबळ! उपनिरीक्षकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

पणे । नगर सहयाद्री:- कायद्याचे रक्षक म्हणून ओळख असलेल्या पोलीस खात्याची काही भक्षक बनलेल्या पोलिसांमुळे...

६०० रुपयात मिळणार एक ब्रास वाळू; ‘असा’ करा अर्ज..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध...

पाकिस्तानला मोठा धक्का!; भारताचा महत्वपूर्ण निर्णय

India vs Pakistan: भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच...