spot_img
अहमदनगरब्रेकिंग: महाराष्ट्र बंदला परवानगी नाही! कायदेशीर कारवाई होणार? कोर्ट म्हणाले..

ब्रेकिंग: महाराष्ट्र बंदला परवानगी नाही! कायदेशीर कारवाई होणार? कोर्ट म्हणाले..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला परवानगी न देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. विरोधी पक्षांनी राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बंदची हाक दिली होती. या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने सुनावणी दरम्यान निर्देश दिले की, “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी असे प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी.” या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होईल आणि सामान्य नागरिकांना त्रास होईल असे म्हंटले आहे.महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली होती. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले होते.

मात्र वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडलीडॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात आक्रमक युक्तिवाद करत, “राज्य सरकारने SIT स्थापन केली आहे आणि पोलिसांना कारवाई केली आहे. तरीही बंद कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला होता. “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...