spot_img
अहमदनगरब्रेकिंग: महाराष्ट्र बंदला परवानगी नाही! कायदेशीर कारवाई होणार? कोर्ट म्हणाले..

ब्रेकिंग: महाराष्ट्र बंदला परवानगी नाही! कायदेशीर कारवाई होणार? कोर्ट म्हणाले..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला परवानगी न देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. विरोधी पक्षांनी राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बंदची हाक दिली होती. या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने सुनावणी दरम्यान निर्देश दिले की, “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी असे प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी.” या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होईल आणि सामान्य नागरिकांना त्रास होईल असे म्हंटले आहे.महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली होती. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले होते.

मात्र वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडलीडॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात आक्रमक युक्तिवाद करत, “राज्य सरकारने SIT स्थापन केली आहे आणि पोलिसांना कारवाई केली आहे. तरीही बंद कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला होता. “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...