spot_img
अहमदनगरदोघी मैत्रिणी क्लासला गेल्या पण परतल्याच नाही! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

दोघी मैत्रिणी क्लासला गेल्या पण परतल्याच नाही! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात आता एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता नगर शहरामधून देखील अशीच काहिशी माहिती समोर आली आहे.

क्लासला गेलेलया २ मुली बेपत्ता झाल्या असून त्यांनाही फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.२१) दुपारी खळेवाडी परिसरात राहणारी १४ वर्ष ७ महिने वयाची मुलगी आणि सैनिक नगर परिसरात राहणारी तिची १४ वर्ष ३ महिने वयाची तिची मैत्रीण या दोघी बेपत्ता झाल्या आहेत. त्या दोघी दुपारी १ च्या सुमारास रयतच्या शाळेच्या पाठीमागे क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. त्या पुन्हा घरी परतल्याच नाहीत.

कुटुंबीयांनी त्यांचा भिंगार शहर परिसरात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...