spot_img
अहमदनगरदोघी मैत्रिणी क्लासला गेल्या पण परतल्याच नाही! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

दोघी मैत्रिणी क्लासला गेल्या पण परतल्याच नाही! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात आता एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता नगर शहरामधून देखील अशीच काहिशी माहिती समोर आली आहे.

क्लासला गेलेलया २ मुली बेपत्ता झाल्या असून त्यांनाही फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.२१) दुपारी खळेवाडी परिसरात राहणारी १४ वर्ष ७ महिने वयाची मुलगी आणि सैनिक नगर परिसरात राहणारी तिची १४ वर्ष ३ महिने वयाची तिची मैत्रीण या दोघी बेपत्ता झाल्या आहेत. त्या दोघी दुपारी १ च्या सुमारास रयतच्या शाळेच्या पाठीमागे क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. त्या पुन्हा घरी परतल्याच नाहीत.

कुटुंबीयांनी त्यांचा भिंगार शहर परिसरात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...