spot_img
अहमदनगरदोघी मैत्रिणी क्लासला गेल्या पण परतल्याच नाही! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

दोघी मैत्रिणी क्लासला गेल्या पण परतल्याच नाही! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात आता एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता नगर शहरामधून देखील अशीच काहिशी माहिती समोर आली आहे.

क्लासला गेलेलया २ मुली बेपत्ता झाल्या असून त्यांनाही फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.२१) दुपारी खळेवाडी परिसरात राहणारी १४ वर्ष ७ महिने वयाची मुलगी आणि सैनिक नगर परिसरात राहणारी तिची १४ वर्ष ३ महिने वयाची तिची मैत्रीण या दोघी बेपत्ता झाल्या आहेत. त्या दोघी दुपारी १ च्या सुमारास रयतच्या शाळेच्या पाठीमागे क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. त्या पुन्हा घरी परतल्याच नाहीत.

कुटुंबीयांनी त्यांचा भिंगार शहर परिसरात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...