spot_img
ब्रेकिंगभाजपचा 'मास्टर प्लान' ; १७ जिल्ह्यांत 'संपर्कमंत्री'

भाजपचा ‘मास्टर प्लान’ ; १७ जिल्ह्यांत ‘संपर्कमंत्री’

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने 17 जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री देऊन भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यात भाजपने संपर्कमंत्री दिले आहेत.राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ पालकमंत्री असलेल्या वाशीम जिल्ह्यात भाजपने जिल्हा संपर्कमंत्री म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्यात अनुक्रमे चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे हे भाजपचे जिल्हा संपर्कमंत्री असणार आहे.

गोंदिया- डॉ. पंकज भोयर, बुलढाणा-आकाश फुंडकर, यवतमाळ-अशोक उईके, वाशीम- राधाकृष्ण विखे पाटील, छ. संभाजीनगर- अतुल सावे, बीड- पंकजा मुंडे, धाराशिव- जयकुमार गोरे, हिंगोली-मेघना बोर्डिकर, जळगाव – गिरीश महाजन, नंदुरबार – जयकुमार रावल, मुंबई शहर- मंगलप्रभात लोढा, ठाणे- गणेश नाईक, रायगड- आशिष शेलार, रत्नागिरी-नितेश राणे, सातारा – शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूर – माधुरी मिसाळ, पुणे – चंद्रकांत पाटील यांची संपर्कमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...