spot_img
ब्रेकिंगभाजपचा 'मास्टर प्लान' ; १७ जिल्ह्यांत 'संपर्कमंत्री'

भाजपचा ‘मास्टर प्लान’ ; १७ जिल्ह्यांत ‘संपर्कमंत्री’

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने 17 जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री देऊन भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यात भाजपने संपर्कमंत्री दिले आहेत.राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ पालकमंत्री असलेल्या वाशीम जिल्ह्यात भाजपने जिल्हा संपर्कमंत्री म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्यात अनुक्रमे चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे हे भाजपचे जिल्हा संपर्कमंत्री असणार आहे.

गोंदिया- डॉ. पंकज भोयर, बुलढाणा-आकाश फुंडकर, यवतमाळ-अशोक उईके, वाशीम- राधाकृष्ण विखे पाटील, छ. संभाजीनगर- अतुल सावे, बीड- पंकजा मुंडे, धाराशिव- जयकुमार गोरे, हिंगोली-मेघना बोर्डिकर, जळगाव – गिरीश महाजन, नंदुरबार – जयकुमार रावल, मुंबई शहर- मंगलप्रभात लोढा, ठाणे- गणेश नाईक, रायगड- आशिष शेलार, रत्नागिरी-नितेश राणे, सातारा – शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूर – माधुरी मिसाळ, पुणे – चंद्रकांत पाटील यांची संपर्कमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...