spot_img
राजकारणभाजपच्या खासदाराचे तिकीट बदलणार !! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सूचक वक्तव्याने चर्चाना उधाण

भाजपच्या खासदाराचे तिकीट बदलणार !! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सूचक वक्तव्याने चर्चाना उधाण

spot_img

रावेर / नगर सहयाद्री : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात २३ उमेदवारांची यादी भाजपने दिली आहे. परंतु आता एका भाजप आमदाराचे तिकीट बदलणार अशी चर्चा रंगली आहे.

रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात भाजपने आपल्या २३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्याच्या वक्तव्यामुळे भाजपच्या विद्यमान खासदारसमोर संकट निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी बदलले जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

रक्षा खडसे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरु झाले आहे. त्याचवेळी संजय पवार यांच्या वक्तव्यामुळे आणखी धक्का बसणार आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द होण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू आहे. बऱ्याच हालचाली सुरू आहे. गेल्या वेळेस प्रचार सुरू असताना स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करण्यात आलं होते. यावेळी मात्र स्मिता वाघ यांना वगळण्यात येणार नाही. मात्र रावेर मतदार संघात काहीही होऊ शकते. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....