spot_img
राजकारणभाजपच्या खासदाराचे तिकीट बदलणार !! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सूचक वक्तव्याने चर्चाना उधाण

भाजपच्या खासदाराचे तिकीट बदलणार !! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सूचक वक्तव्याने चर्चाना उधाण

spot_img

रावेर / नगर सहयाद्री : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात २३ उमेदवारांची यादी भाजपने दिली आहे. परंतु आता एका भाजप आमदाराचे तिकीट बदलणार अशी चर्चा रंगली आहे.

रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात भाजपने आपल्या २३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्याच्या वक्तव्यामुळे भाजपच्या विद्यमान खासदारसमोर संकट निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी बदलले जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

रक्षा खडसे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरु झाले आहे. त्याचवेळी संजय पवार यांच्या वक्तव्यामुळे आणखी धक्का बसणार आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द होण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू आहे. बऱ्याच हालचाली सुरू आहे. गेल्या वेळेस प्रचार सुरू असताना स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करण्यात आलं होते. यावेळी मात्र स्मिता वाघ यांना वगळण्यात येणार नाही. मात्र रावेर मतदार संघात काहीही होऊ शकते. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...