spot_img
ब्रेकिंगभाजप नेते विखेंचे मंत्रीपद फायनल! अहिल्यानगर मधून कुणाला मिळणार संधी? वाचा, यादी..

भाजप नेते विखेंचे मंत्रीपद फायनल! अहिल्यानगर मधून कुणाला मिळणार संधी? वाचा, यादी..

spot_img

अहियानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अखेर दहाव्या दिवशी महायुतीकडून कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ शपथविविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा जिल्ह्यात महायुतीला दहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातील कोणाकोणाची वण लागणार याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, मंत्रिपदासाठी भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, आशुतोष काळे आदी दावेदार मानले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात दणदणीत यश मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याचा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महायुतीच्या घटक पक्षांत गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरु होता. दहाव्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रम होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील किती जणांचा समावेश होणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात 12 जागांपैकी 10 जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले व विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे व काशीनाथ दाते तर शिवसेनेचे विठठलराव लंघे व अमोल खताळ यांचा समावेश आहे.

भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जातात. मात्र, त्यांना कोणते खाते मिळणार याकडे जनतेचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मोनिका राजळे तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत. महिला म्हणून त्या देखील दावेदार आहेत. शिवाजी कर्डिले हे सहाव्यांदा विधानसभेवर गेले आहेत. मुरब्बी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची वण देखील लागू शकते. राज्यात महायुतीला 80 टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे मंत्रिपदासाठी भाजपमध्ये दावेदाराची संख्या अधिक आहे. आमदार राम शिंदे याचा निसटता पराभव झाला आहे. ते फडणवीस यांचे समर्थक आहेत त्यामुळे त्यांची देखील मंत्रिमंडळात वण लागल्यास नवल नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांनी हॅट्रिक केली आहे. त्यांना देखील लॉटरी लागण्याची शक्यता आहे. आशुतोष काळे अजित पवार यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे आशुतोष काळे हे देखील मंत्रिपदासाठी दावेदार मानले जातात. डॉ. किरण लहामटे हे आदिवासी प्रवर्गातील आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संगमनेर मतदारसंघातून अमोल खताळ व नेवासा मतदारसंघातून विठठलराव लंघे विजयी झाले. दोन्ही आमदारांनी सहकाराबद असलेल्या नेत्यांचा पराभव केला आहे. खताळ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भावी मुख्यमंत्री महणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वेसवां एकनाथ शिंदे यांच्याकडून खताळ यांचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...