spot_img
ब्रेकिंग'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान'

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत कायदा-सुव्यवस्था इतकी बिघडली होती की गृहमंत्री जेलमध्ये गेले होते अशी टीकाही त्यांनी केली.

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर विरोधक कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याबद्दल विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. “आरोपीने पोलिसांवर गोळी चालवली तर पोलिसांनी गोळी का चालवली? असं विचारतात. हे डबल ढोलकीवाले आहेत. यांच्यात काही नैतिकता नाही. बदलापूरमधील आरोपीची बाजू घेणारे हे लोक काय कायद्याची भाषा करतात”.

बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. “बाबा सिद्धीकी लोकप्रतिनिधी होते. दोघांना अटक केली असून एक फऱार आहे, त्याला लवकर पकडलं जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला लढून फाशी देण्याची विनंती करु. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही,” असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

“महाविकास आघाडीत तर गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. कायदा-सुव्यवस्था इतकी बिघडली होती. उद्योगपतीच्या घऱाखाली बॉम्ब लावत होते, त्यात पोलीस सहभागी होती. गॉटेलमधून पैसे वसूल करत होते. त्यावेळी गृहमत्री जेलमध्ये होते. आता जो कायदा हातात घेईल त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. फाशीची शिक्षा दिली जाणार. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...