spot_img
ब्रेकिंगटोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसाठी २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू करण्यात आली होती. मात्र आता ऐन दिवाळीत केली जाणारी ही भाडे वाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बसच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हंगामी भाडेवाढ रद्द
भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास महागणार होता. दिवाळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणाच्या शक्यता होती. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.

दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जात असते, त्याप्रमाणे या वर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे.

प्रवाशांना दिलासा
यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले होते. एसटी महामंडळाने साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले होते. एक महिन्यासाठी ही भाडेवाढ कायम राहणार होती. हंगाम संपल्यानंतर 26 नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होणार होती. मात्र, एसटीच्या निर्णयामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानंतर आता राज्य सरकारकडून एसटी प्रवाशांना देखील मोठा दिलासा दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...