spot_img
अहमदनगरअहमदनगरमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा? महायुती सरकारमुळे 'ते' काम अंतिम टप्प्यात

अहमदनगरमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा? महायुती सरकारमुळे ‘ते’ काम अंतिम टप्प्यात

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेल्या दुष्काळी पट्टयातील बारा गावांसाठी महायुती सरकारने दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भोजापूर चारीच्या सोळा किलो मीटर काम अंतिम टप्प्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्याना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेली अनेक वर्षे भोजापूर चारीचा प्रश्न प्रलंबित होता.त्यामुळे भोजापूर धरणात पाणी असूनही पाण्या पासून वंचित राहाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत होती.विशेष म्हणजे ही गावे निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेली होती. या गावांना भोजापूर पाण्याशिवाय पर्याय नव्हता.निधी अभावी कामाची सुरूवात होत नव्हती.बहुतेक वेळा ठेकेदार बदलत गेल्याने कामातही अडथळे निर्माण होत होते.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंधारण विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या चारीच्या कामाला सुरूवात होवू शकली. आता चारीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. पावसाळ्यात या चारीतून पाण्याचे वहन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

तळेगाव भाग नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जायचा.आता निळवंडे कालव्यातून पाण्याची उपलब्धता झाल्याने वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना युती सरकारमुळे न्याय मिळाला.आता भोजापूर चारीच्या सर्वच कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकर्याची अनेक वर्षांची प्रतिक्षा आता संपुष्टात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तुम्ही काट माराल तर मीही काट मारणार, उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले…

बारामती / नगर सह्याद्री : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित...

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, सोलापूरमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर / नगर सह्याद्री : देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना सोलापूरमध्ये झाली आहे....

जगताप -विखे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ; तब्बल २६ कोटी निधी मंजूर, काय होणार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या पाठपुराव्याने...

मोठी बातमी! काँग्रेसची ‘मनसे’ साथ? विजय वडेट्टीवार यांचे मोठे संकेत काय?

मुंबई / नगर सह्याद्री मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईतील स्थानिक नेतृत्वाला...