spot_img
ब्रेकिंगAhmednagar: मोठी बातमी!! तहसीलदार निलंबित? नेमकं प्रकरण काय

Ahmednagar: मोठी बातमी!! तहसीलदार निलंबित? नेमकं प्रकरण काय

spot_img

राहुरी। नगर सहयाद्री-

जिल्ह्याच्या वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राहुरी कार्यालयात कार्यरत असलेले तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

तहसीलदार चंद्रजित राजपूत हे राहुरीत कार्यरत झाल्यापासून नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. राजपूत यांच्या कार्यपध्दतीवर राहुरीतील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते नेहमीच सोशल माध्यमांवर नाराजी व्यक्त करीत होते.

राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखान्याच्या मालकीच्या जमिनीतून मुरूम उत्खनन प्रकरणी त्यांचे व मुरूम वाहतूकदारांच्या अर्थपूर्ण संबंधाची चर्चा राहुरी फॅक्टरी परिसरात सुरू असतानाच ते निलंबित झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जून ते ऑक्टोबर २०२० साली अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले आहे. त्याच्याविरुध्द शासन ज्ञापन दि.२०.११.२०२३ अन्वये म.ना. से (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ व १२ अन्वये विभागीय चौकशी सुरु होती. त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये चंद्रजित राजपुत यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीतील त्यांना मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे राहुन त्यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये. असे आदेश श्री राणे यांनी दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...

शहरात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा; संविधानाच्या उपदेशकेचे सामूहिक पठन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

जगात भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । नगर सहयाद्री:- संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायाचा मंत्र...