spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या गावात दगडफेक; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, नेमकं...

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या गावात दगडफेक; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, नेमकं काय घडलं? पहा..

spot_img

Manoj Jarange Patil: एकीकडे महाराष्ट्र भरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा एकदा आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे-पाटील आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मूळगाव (मातोरी) येथे दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. मातोरी गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यामध्ये मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उगारले होते. जरांगे पाटील हे मराठा आरक्षण ओबीसीमधूनच पाहिजे असल्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर हाके ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगाव (मातोरी) येथे दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

नेमकं घडलं काय?
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा काल बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे होता. मात्र, त्यापूर्वीच सायंकाळी म्हणून जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर तसेच रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. मातोरी गावात मोठा तणाव निर्माण झाला. त्यानंतर मातेरी गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...