spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी : चिलीच्या जंगलात अग्निकल्लोळ ! 46 मृत्युमुखी, हजारो घरे जळाली

मोठी बातमी : चिलीच्या जंगलात अग्निकल्लोळ ! 46 मृत्युमुखी, हजारो घरे जळाली

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. चिलीच्या जंगलामध्ये भीषण अग्निकल्लोळ उडाला आहे. ही आग इतकी भीषण आहे की यात 46 जणांचा मृत्यू झाला असून हजारो घरे जळाली आहेत.

मध्य आणि दक्षिण चिलीमध्ये ही आग लागली आहे. जंगलातील आगीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीम खबरदारीचा उपाय म्हणून जळालेल्या घरांमध्ये शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील आग पसरत असल्याने धोका आणखी वाढला आहे.

भीषण आग पाहता चिली सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. चिलीच्या गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितलं की, सध्या देशाच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडील 92 जंगलांना आग लागली आहे, जेथे या आठवड्यात तापमान खूप वाढले आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात जंगलातील भीषण आग पसरल्याने जवळपास 1100 घरं जळून खाक झाली. सर्वात भीषण आग वालपराइसो परिसरात लागली.

अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांची हालचाल सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. वालपराइसो परिसरात तीन निवारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. चिलीच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 19 हेलिकॉप्टर आणि 450 हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...