spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी : चिलीच्या जंगलात अग्निकल्लोळ ! 46 मृत्युमुखी, हजारो घरे जळाली

मोठी बातमी : चिलीच्या जंगलात अग्निकल्लोळ ! 46 मृत्युमुखी, हजारो घरे जळाली

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. चिलीच्या जंगलामध्ये भीषण अग्निकल्लोळ उडाला आहे. ही आग इतकी भीषण आहे की यात 46 जणांचा मृत्यू झाला असून हजारो घरे जळाली आहेत.

मध्य आणि दक्षिण चिलीमध्ये ही आग लागली आहे. जंगलातील आगीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीम खबरदारीचा उपाय म्हणून जळालेल्या घरांमध्ये शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील आग पसरत असल्याने धोका आणखी वाढला आहे.

भीषण आग पाहता चिली सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. चिलीच्या गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितलं की, सध्या देशाच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडील 92 जंगलांना आग लागली आहे, जेथे या आठवड्यात तापमान खूप वाढले आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात जंगलातील भीषण आग पसरल्याने जवळपास 1100 घरं जळून खाक झाली. सर्वात भीषण आग वालपराइसो परिसरात लागली.

अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांची हालचाल सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. वालपराइसो परिसरात तीन निवारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. चिलीच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 19 हेलिकॉप्टर आणि 450 हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...