spot_img
महाराष्ट्रलाडकी बहीण योजनेत मोठा बदलल; 'या' महिलांचा लाभ होणार बंद?, वाचा..

लाडकी बहीण योजनेत मोठा बदलल; ‘या’ महिलांचा लाभ होणार बंद?, वाचा..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आता एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याआधी काही कुटुंबांतील तीन ते चार महिलांनी लाभ घेतल्याचे आढळून आल्यानंतर सरकारने अर्जांची पुनर्पडताळणी सुरू केली आहे. त्यानुसार, अटींचा भंग करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.

महत्वाचे म्हणजे, योजनेच्या अटींच्या विरोधात जाऊन अनेक महिलांनी आधारकार्डवरील जन्मतारीख बदलून, वेगवेगळी रेशनकार्डं दाखवून किंवा उत्पन्नाची खोटी माहिती देऊन लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा महिलांच्या अर्जांवर एफएससी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा देऊन लाभ थांबवण्यात येत आहे. याचसोबत अनेक महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या महिलांच्याही अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती प्राप्तिकर विभाग महिला व बालविकास विभागाला देईल. त्याआधारे पडताळणी केली जाईल. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत असल्याचेही सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी पर्याय दिला आहे. दरम्यान, अनेक महिलांना दर महिन्याला लाभ मिळत होता. परंतु हा लाभ अचानक बंद झाल्याने महिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामध्ये एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील त्यांचा समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...