spot_img
महाराष्ट्रभुजबळांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्याच..

भुजबळांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्याच..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाला कोर्टात आव्हान देऊ असे म्हटले होते. आता यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत जरांगे यांना इशाराच दिला आहे. भुजबळ म्हणाले की, मंडल आयोगाला त्यांनी आव्हान द्यायला हवे.

त्यांच्याएवढा ज्ञानी कुणी नाही. ज्याला लाख आणि कोटी समजत नाही ते मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करतायेत. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावे. हे माझे चॅलेंज आहे असा इशाराच मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजातील जे जाणकार लोक आहेत ते आम्हाला वेगळे आरक्षण द्या, कुणबी म्हणून देऊ नका असे म्हणत आहेत. मराठा आरक्षणासाठी कायदा बनलेला आहे. त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन आहे. मात्र तरीही मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्रे देण्याचं काम सुरू आहे. या झुंडशाहीपुढे नमते घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे.

भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला धक्का न लागता तुम्हाला ज्यांना आरक्षण द्यायचे आहे ते द्या. पण आमचे आरक्षण कशाला धक्का लावताय?, ते एका मराठा जातीसाठी लढतायेत, मी एका वर्गासाठी लढतोय, जो मागास आहे असं भुजबळांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या हे आम्ही बोलतोय. आमदार ते मंत्र्यांपर्यंत आमची बाजू मांडणे, आमची कैफियत कोर्टात मांडणे, लोकांमध्ये रॅली, आक्रोश करणे, संविधानाने जे काही आम्हाला अधिकार दिलेत त्यानुसार आमच्यावर जो अन्याय होतोय त्याविरोधात आम्ही आयुधे वापरू असं त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तपोवन परिसरातील बिबट्या जेरबंद; पहाटे चार वाजता पिंजऱ्यात अडकला

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर शहराजवळील तपोवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या...

मामा भांजे कर्मचारी, फौज तो तेरी सारी है,..; सुजय विखे पाटीलांनी ऐन थंडीत संगमनेरचे राजकीय वातावरण गरम केले.

सुजय विखे पाटीलांचा बाळासाहेब थोरांतसह सत्यजित तांबेंवर थेट हल्ला संगमनेर । नगर सहयाद्री:- मामा भांजे...

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; १२ जिल्ह्यांतील ३५ जागांवरील मतदान रद्द

१२ जिल्ह्यांतील ३५ जागांवरील मतदान रद्द; न्यायालयातील सुनावणी न झाल्याने कारवाई स्थगित मुंबई । नगर...

दोन डिसेंबरनंतर राजकीय भूकंप होणार? महायुतीत फुट पडणार?, ‘बड्या’ नेत्याचा सूचक विधानांमुळे खळबळ

मुंबई । नगर सहयाद्री:- नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष...