spot_img
अहमदनगरभिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भिंगार शहरासाठी स्वतंत्र क वर्ग नगरपालिका अस्तित्वात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून नगरपालिकेसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात भिंगार, पुणे, खडकी, छत्रपती संभाजीनगर येथील देवळाली, कामठी छावणी मंडळ महापालिका व नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, भिंगार छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आदी उपस्थित होते. भिंगार छावणी मंडळ महापालिकेत विलीन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी याबाबतचा ठराव सादर केला.

अहिल्यानगर शहर व भिंगार भौगोलिकदृष्ट्‌‍या संलग्नता त्यामुळे भिंगार शहर महापालिकेत समाविष्ट करू नये, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. यादृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आमदार संग्राम जगताप यांनी भिंगार शहर महापालिकेत समाविष्ट करणे शक्य नसेल तर भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी केली. त्यावर भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला. 2011 च्या जनगणनेनुसार भिंगार शहराची लोकसंख्या 28 हजार 986 इतकी आहे.तर भिंगार शहराचे क्षेत्रफळ 12.17 चौरस किलोमीटर इतके आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...