spot_img
अहमदनगरभरधाव पिकअपची मतदारांना धडक; तीन ठार, कुठे घडली घटना? वाचा..

भरधाव पिकअपची मतदारांना धडक; तीन ठार, कुठे घडली घटना? वाचा..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मोटारसायकल व पिकअपच्या झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोले तालुक्यातील देवठाण-सिन्नर रस्त्यावर घडली. मृतांमध्ये धुमाळवाडी व पिंपळगाव नाकविंदा येथील तरुणांचा समावेश आहे. अकोले विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावून गणेश भिकाजी झोळेकर, सर्वेश संतोष झोळेकर, अनिकेत सुभाष लगड व ज्योती सुभाष झोळेकर हे सिन्नरच्या दिशेने चालले होते.

त्यावेळी देवठाण (ता.अकोले) गावाजवळील गायकवाड वस्तीजवळ हे सर्वजण रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव आलेल्या एका मालवाहू पिकअपने या चौघांना जोराची धडक दिली. पिकअप गाडीची धडक जोराची बसल्याने गणेश झोळेकर, सर्वेश झोळेकर व अनिकेत लगड या तिघांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी सर्वांना तत्काळ अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिघांनाही मृत घोषित केले.

ज्योती झोळेकर या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातातील मृत पावलेले तरुण अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याचे समजते. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....