spot_img
ब्रेकिंगसावधान! हवामानात बदल, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

सावधान! हवामानात बदल, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
देशभरात हवामानाचे विविध रंग पाहायला मिळत असताना, महाराष्ट्रात मात्र उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागच्या माहितीनुसार, पुढील 24 ते 48 तासांत देशभरातील हवामानात बदल दिसून येणार आहेत. तसेच उत्तर भारतात सोसाट्याचा वारा आणि पश्चिम हिमालयीन भागात बर्फवृष्टी होणार असली, तरी महाराष्ट्रात मात्र प्रचंड उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये ताशी 30-35 किमी वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. तसेच हिमालयीन प्रदेशात एक नवीन पश्चिमी झंझावात येणार असून, यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी होणार आहे.

दरम्यान, फेब्रुवारीपासूनच राज्यात तापमान वाढू लागले आहे आणि सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊनही चाळीशी ओलांडल्यासारखा दाह जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यातही उन्हाचा कहर जाणवणार आहे. तसेच किनारपट्टी भागात दमटपणा वाढेल, त्यामुळे मुंबईकरांना लवकर दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...