spot_img
ब्रेकिंगभिकारी सरकार! कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

भिकारी सरकार! कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

spot_img

रमी व्हिडीओनंतर पत्रकार परिषदेत सरकारलाच ठरवले ‘भिकारी’, विरोधक आक्रमक
नाशिक | नगर सहयाद्री:-
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारलाच ‘भिकारी’ ठरवणारे वक्तव्य करून पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले, “शेतकऱ्यांकडून शासन १ रुपया घेतं. शासन शेतकऱ्यांना १ रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण? शासन आहे, शेतकरी नाही.” त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत जोरदार टीका केली.

महाराष्ट्राच्या जनतेच्या, राज्यकर्त्यांच्या आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा हा घोर अपमान आहे. महाराष्ट्राला ‘भिकारी’ म्हणणे ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे,” असे म्हणत त्यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलता नसणारे कृषीमंत्री या राज्याने कधी पाहिले नव्हते. सभागृहात रमी खेळणे आणि नंतर राज्यालाच भिकारी म्हणणे, हे सहन केले जाणार नाही. असे म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...