spot_img
महाराष्ट्रबीड की बिहार? पुन्हा दोन सख्ख्या भावांची हत्या! कारण काय?

बीड की बिहार? पुन्हा दोन सख्ख्या भावांची हत्या! कारण काय?

spot_img

Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहे. अशात बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अजय भोसले (३० वर्षे) आणि भरत भोसले (३२ वर्षे) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावं आहेत.

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामधील वाहिरा परिसरात ही घटना घडली. दोघे भाऊ बीड-नगर हद्दीवरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे रहिवासी होते.हातवळण गावापासून ५ किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...