spot_img
महाराष्ट्रबीड की बिहार? पुन्हा दोन सख्ख्या भावांची हत्या! कारण काय?

बीड की बिहार? पुन्हा दोन सख्ख्या भावांची हत्या! कारण काय?

spot_img

Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहे. अशात बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अजय भोसले (३० वर्षे) आणि भरत भोसले (३२ वर्षे) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावं आहेत.

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामधील वाहिरा परिसरात ही घटना घडली. दोघे भाऊ बीड-नगर हद्दीवरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे रहिवासी होते.हातवळण गावापासून ५ किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...