spot_img
ब्रेकिंगकाळजी घ्या! IMD चा तीव्र इशारा; ‘या’ भागात उष्णतेची लाट

काळजी घ्या! IMD चा तीव्र इशारा; ‘या’ भागात उष्णतेची लाट

spot_img

मुंबई । सहयाद्री
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे. ५ ते ८ एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर या नऊ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून उकाड्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत या त्रासात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रासह उत्तर-पश्चिम भारतातही उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही उन्हाची तीव्रता जाणवू शकते. IMD ने यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. २०२२ च्या एका अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा भविष्यात अधिक तीव्र आणि वारंवार होणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...