spot_img
अहमदनगर'प्रहार'च्या श्रीगोंदा शहराध्यक्षपदी बनसोडे, तालुका उपाध्यक्षपदी आढाव व भैलुमे

‘प्रहार’च्या श्रीगोंदा शहराध्यक्षपदी बनसोडे, तालुका उपाध्यक्षपदी आढाव व भैलुमे

spot_img

आप्पा चव्हाण / नगर सह्याद्री : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू व जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, नाना पारदे तालुका अध्यक्ष नगर यांच्या कार्याला प्रेरित होऊन श्रीगोंदा येथील युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.  यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी कृष्णा खामकर. प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीगोंदा शहराध्यक्षपदी माधव बनसोडे तर श्रीगोंदा तालुका उपाध्यक्षपदी संदीप सुभाष आढाव व ज्ञानदेव भैलुमे, गुरु गायकवाड तालुका अध्यक्ष युवक, अमोल कांबळे तालुका उपाध्यक्ष युवक आदींची निवड करण्यात आली. गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे झालेल्या आढावा बैठकीत नियुक्ती करण्यात आली.

प्रहार जनशक्ती पक्ष सर्वच राजकीय पक्षापेक्षा आगळे वेगळे काम करत असून प्रहार १०% राजकारण व ९०% समाजकारण करत आहे. असंख्यजन प्रहार पक्षात सामील होत आहेत असे सुरेश सुपेकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी उपस्थित विजू भंडारी संघटक अध्यक्ष, अंकुश शिंदे, अमोल झेंडे, दत्ता वाळके, जयदीप मगर, प्रिया काळे महिला तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...