spot_img
ब्रेकिंगबळीराजाचा जीव धोक्यात! चारा आणायला गेलेला शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..

बळीराजाचा जीव धोक्यात! चारा आणायला गेलेला शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..

spot_img

Tiger Attack: गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत शेतकऱ्याचे नाव मधुकर राउत (वय ५५) असे असून, ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे. स्थानिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर राऊत हे सकाळी चारा आणण्यासाठी शेतात गेले होते, मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी जंगलात शोध सुरू केला. शोधादरम्यान, त्यांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून तब्बल दीड किलोमीटर जंगलात ओढत नेल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या घटनेमुळे पारशिवानी तालुक्यातील कालभैरव पेठ परिसरात भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत सहा लोकांचा बळी वाघाच्या हल्ल्यात गेला आहे.आम्हाला दररोज जीव मुठीत घेऊन शेतात जावं लागतं. किती माणसांचे बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. स्थानिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...

महाभूकंप! ८.७ तीव्रतेच्या भूकंपाने पॅसिफिक महासागर हादरला, त्सुनामीचा धोका

नगर सह्याद्री वेब टीम : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची...

शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘दीप चव्हाण’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप...

लाखो नागरिकांचे हाल, केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांची मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे...