spot_img
अहमदनगरबॅड टच भोवला, पोलिसांनी घेतली खमकी भूमिका..; पुढे झाले असे...

बॅड टच भोवला, पोलिसांनी घेतली खमकी भूमिका..; पुढे झाले असे…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर शहरातील एका प्राथमिक शाळेजवळ गेटलगत ताक विकणार्‍या इसमाने शाळकरी मुलींना गेल्या महिन्याभरापासून त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका पीडित मुलीच्या वडिलाने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैभव बबन हुच्चे (रा. माळीवाडा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची 10 वर्षीय मुलगी अहिल्यानगर शहरातील एका प्राथमिक शाळेत शिकत असून ती शाळेत रोज सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिक्षण घेते. 23 एप्रिल रोजी रात्री 9.30 च्या सुमारास मुलगी रडत घरी आली व तिने वडिलांना सांगितले की, शाळेजवळ ताक विकणारा एक इसम मागील महिन्यापासून तिच्या व तिच्या मैत्रिणींना बॅड टच करतो. याबाबत घरी कोणाला सांगू नकोस, असे धमकावतो.

या प्रकाराची खात्री करण्यासाठी दुसर्‍या दिवशी, 24 एप्रिल रोजी सकाळी 11.45 वाजता फिर्यादी शाळेजवळ थांबले. शाळा सुटल्यानंतर त्यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह शाळे बाहेर येत असताना ताकविक्रेता इसमाने पुन्हा गैरवर्तन केल्याचे आढळून आले. यावेळी फिर्यादीने त्याला जाब विचारला असता संबंधित इसमाने त्यांच्या अंगावर धावून जात त्यांची गचंडी पकडून भांडण केले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला व शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव वैभव बबन हुच्चे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...