spot_img
देशरामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत 'या' देशाचा हात?

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

spot_img

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव बाबा यांनी या अपघाताबाबत एक खळबळजनक शक्यता उपस्थित केली आहे. त्यांनी या दुर्घटनेमागे तुर्कीचा आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचा हात असू शकतो, असा दावा करत ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर वाढलेल्या भारत-पाक तनावाकडे लक्ष वेधलं आहे. रामदेव बाबा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ही एक नैसर्गिक चूक नव्हती तर एक नियोजित कट असू शकतो. विशेषत: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि तुर्कीमध्ये भारतविरोधी समन्वय वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर या अपघाताची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे.

रामदेव बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानाच्या देखभालीचं काम तुर्कीच्या एका कंपनीकडे सोपवण्यात आलं होतं, आणि दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं कंत्राट थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे या कंपनीने सूड घेण्याच्या हेतूने काही तांत्रिक छेडछाड केली असेल का, हा संशोधनाचा भाग असायला हवा. त्यांनी असाही सवाल उपस्थित केला की, तुर्की देशाच्या हस्तक्षेपामुळे भारताच्या हवाई क्षेत्रावर धोका निर्माण होत आहे का? तुर्की किंवा पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या घटकांनी विमान अपघात घडवून आणला का? यावर चौकशीसाठी राष्ट्रीय पातळीवर समिती नेमावी, अशी त्यांची मागणी आहे.

रामदेव बाबांनी नमूद केलं की, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला होता. पाकिस्तानला पाठींबा देणाऱ्या तुर्कीने या अपघाताद्वारे सूड तर घेतलेला नाही ना? असा सवाल उपस्थित केला आहे.दरम्यान, रामदेव बाबांनी उपस्थित केलेल्या या शक्यतेमुळे तपास यंत्रणांवर दबाव वाढला आहे. आता या दाव्यांवर DGCA, CBI किंवा इतर तपास यंत्रणा अधिकृत चौकशी करतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

विमान अपघातावेळी नेमकं काय घडलं? नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितली महत्वपूर्ण अपडेट

Air India Plane Crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला...