spot_img
अहमदनगरदलित महिला सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; नागरिकांनी केली मोठी मागणी

दलित महिला सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; नागरिकांनी केली मोठी मागणी

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर (ता. श्रीगोंदा) येथील दलित समाजातील विद्यमान महिला सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा श्रीगोंदा शहरात तीव्र निषेध करण्यात आला असून, गुन्हेगारांना दोन दिवसात अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशार विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.

याबाबत पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे व पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन दिले आहे. यावेळी आर.पी.आयचे नेते जिवाजीराव घोडके, राष्ट्रवादी समाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष संदीप उमाप, कुणाल शिरवाळे (अजित पवार गट), मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष नंदकुमार ससाने, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, शिवाजी घोडके, संदीप भोईटे (शिंदे गट), अजित भोसले, राजू ससाने, अ‍ॅड. प्रेरणा धेंडे, रतन पवार आदी उपस्थित होते.

रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी सरपंच मीनाक्षी सकट या तालुक्यातून आपल्या घरी परतत असताना, काही गावगुंडांनी त्यांच्यावर व त्यांच्या लहान मुलावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली, मीनाक्षी सकट गंभीर जखमी झाल्या, तर त्यांच्या मुलाला मारहाण करून दुखापत करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराजांना पोलीस संरक्षण द्या; भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराज यांच्यावर...

करण ठुबे याने नीटमध्ये उज्वल यश मिळवून कुटुंब, गाव, पारनेर पब्लिक स्कूलचे नाव उंचावले

नीटमध्ये यश मिळाल्याबद्दल मित्र परिवार व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार सुपा | नगर सह्याद्री करण दादाभाऊ...

मीच ज्योतीरामला मारला! वेटरनेच घेतला वेटरचा जीव, अहिल्यानगरमधील घटना, कारण काय?

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड तालुक्यातील शिऊरफटा येथील सात बारा हॉटेलमध्ये किरकोळ वादातून वेटरने...

कोसळधार! आभाळ फाटणार? राज्यात रेड अलर्ट, कुठे कशी परिस्थिती? वाचा सविस्तर..

Maharashtra Rain Update: राज्यात कालपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे....