spot_img
अहमदनगरगोरक्षकावर हल्ला! गुन्हा दाखल, अहमदनगर मधील घटना

गोरक्षकावर हल्ला! गुन्हा दाखल, अहमदनगर मधील घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
गाडी पोलीस स्टेशनला चालवत आणल्याच्या रागातून दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात घडला. त्यानंतर रात्री उशिरा शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

अशोकनगर येथील चंद्रकांत निर्मळ आणि त्यांचा मित्र राहुल मापारी हे दोघे गुरुवारी रात्री अशोकनगरहून श्रीरामपूरकडे येत असताना त्यांना बोरावके कॉलेजकडे जाणाऱ्या बोगद्याजवळ जमावाने एक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची झेनॉन गाडी आडवलेली दिसली तेव्हा सदर गाडीमध्ये गाया होत्या. त्यानंतर पोलिसांनी तेथे येऊन गाडी कोणाला चालवता येते का? असे विचारले असता चंद्रकांत निर्मळ यांनी होकार दिला.

त्यांनी ही गाडी चालवत पोलीस स्टेशनला आणली. त्यानंतर बुंदी कुरेशी, शाहरुख कुरेशी, तौफिक कुरेशी, मोहसीन कुरेशी, अदनान कुरेशी, सदाम कुरेशी, इरफान शेख, शाहरुख कुरेशी यांनी गाडी चालवत आणलेल्या चंद्रकांत निर्मळ यांना तु गाडी का चालवत आणली. तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत सर्वांनी चंद्रकांत निर्मळ व राहुल मापारी यांना रिंगण करून मारहाण केली.

मारहाण करत असताना मोहसीन कुरेशी याने निर्मळ यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा शाहीद कुरेशी याने कमरेच्या पट्टा निर्मळ यांच्या गळ्यात टाकून आवळला. तसेच शाहरुख कुरेशी याने यावेळी धारदार शस्त्राने निर्मळ यांच्या पोटात वार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हुकवल्याने त्यांच्या बोटाला दुखापत झाली. तसेच आरोपींनी आमच्या नादी लागले तर जिवंत सोडणार अशी धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! शिर्डीतील साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी

शिर्डी । नगर सहयाद्री:- पहलगाम हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जाणारं देवस्थान...

पोलीस दलात खळबळ! उपनिरीक्षकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

पणे । नगर सहयाद्री:- कायद्याचे रक्षक म्हणून ओळख असलेल्या पोलीस खात्याची काही भक्षक बनलेल्या पोलिसांमुळे...

६०० रुपयात मिळणार एक ब्रास वाळू; ‘असा’ करा अर्ज..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध...

पाकिस्तानला मोठा धक्का!; भारताचा महत्वपूर्ण निर्णय

India vs Pakistan: भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच...