spot_img
राजकारणपक्ष हातून जाताच शरद पवारांनी 'ठेवणीतली' खेळी खेळली ! ‘गोविंदबाग’मध्ये हालचाली वाढल्या

पक्ष हातून जाताच शरद पवारांनी ‘ठेवणीतली’ खेळी खेळली ! ‘गोविंदबाग’मध्ये हालचाली वाढल्या

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण विविध रंग घेत आहे. त्यात राधोतरावाडीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या हातून पक्ष व चिन्ह दोन्ही गेले. परंतु कितीही विरोधी परिस्थिती असली तर त्यातून मार्ग काढून आपला दबदबा कायम ठेवतात अशी शरद पवार यांची देशात ओळख आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबाबत सर्वत्र चर्चा होतेय. असं असतानाच शरद पवार त्यांची जुनी खेळी खेळताना दिसत आहेत.

लोकांशी संपर्क करणं, भेटीगाठी घेणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं ही शरद पवार यांची जुनी राजकीय निती आहे. लोकांचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. असं शरद पवार म्हणतात. आता पक्ष हातून गेल्यानंतर हीच रणनिती शरद पवार पुन्हा एकदा आखताना दिसत आहेत. पक्ष हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा बारामतीत आहेत. अशात ते जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.

शरद पवार आता राष्ट्रवादीपासून दूर गेलेल्या नेत्यांना भेटत आहेत. इंदापूरच्या पिता-पुत्रांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी गोविंदबाग येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पृथ्वीराज जाचक यांचे चिरंजीव कुणाल जाचक उपस्थित होते. या दौऱ्यामुळे इंदापूर तालुक्यात नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केले आहे.

पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत. कालपासून गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. सकाळपासून पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...