पारनेर । नगर सहयाद्री:-
गोदावरी खोऱ्यात बंधारे बांधण्यासाठी बंदी असल्यामुळे पावसाळ्यात पडणारे सगळे पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात हाता तोंडाशी आलेले पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. त्यामुळे गोदावरी खोऱ्यात बंधारे बांधण्यासाठी असलेली बंदी उठवा तसेच तांबडीकार धरण व वारणवाडी येथील शिपाई चोंडी बांधारा बांधण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र संघटनेचे संतोष वाडेकर यांनी केली.
पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतीसाठी कुकडी प्रकल्पातून हक्काचे पाणी मिळावे, यासाठी भूमिपुत्र संघटनेच्या वतीने गाव तिथे कृती समिती अभियान सुरू आहे. वारणवाडी येथे कृती समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर बोलत होते.
यावेळी सरपंच संजय काशीद, भाऊसाहेब कोकाटे, अन्सार पटेल, महेंद्र काशीद, संजय भोर, विशाल कोकाटे,सचिन कोकाटे, चेअरमन संजय भोर,अशोक बेलकर, नानाभाऊ काशीद, पंडित गायके, बाबासाहेब काशीद, अक्षय गुंड, संतोष पानमंद, विशाल थोरात, मंजाबापू वाडेकर, पांडुरंग बेलकर, राहुल काशीद,विष्णू काशीद, पांडुरंग पानमंद, सुशील थोरात, राजेंद्र कोकाटे, जयसिंग काशीद, पाटील काशीद, जगदीश बेलकर, नवनाथ कराळे, अर्जुन कोकाटे, गणेश काशीद, विठ्ठल काशीद, पांडुरंग कोकाटे, अमोल पानमंद, विलास बेलकर, विश्वास थोरात, जनार्दन काशीद, उत्तम कोकाटे, विकास काशीद, किसन काशीद, ज्ञानेश्वर कोकाटे, विक्रम कोकाटे, निलेश काशीद, सतीश काशीद, तुषार गुंड, बाळू काशीद, गणपत चौधरी, अशोक काशीद, प्रवीण रोकडे, हरी कोकाटे, सुरेश बेलकर, पंढरीनाथ कोकाटे, बाबाजी काशीद, विष्णू बेलकर, धोंडीबा काशीद, विष्णू कोकाटे, सुरेश काशीद, संतोष काशीद, नवनाथ पानमंद, राजेंद्र गुंड, बबन कोकाटे, पोपट काशीद, बाळासाहेब गायके, तुषार काशीद, बाबाजी कोकाटे ,बबन थोरात, हनुमंत थोरात, लक्ष्मण चौधरी, विनोद काशीद आदि उपस्थित होते.