spot_img
देशसगळे आऊट ! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची स्थिती बिकट, पहा किती रन..आता...

सगळे आऊट ! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची स्थिती बिकट, पहा किती रन..आता गोलंदाजांच्या हातात मदार

spot_img

नगर सह्याद्री / गुजरात : सध्या भारत ऑस्ट्रेलिया फायनलसुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व गाजवले. नाणेफेक जिंकल्यावर पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

परंतु भारताची दैना झाली. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी टीम इंडियाची लाज वाचवली.भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियापुढे आता २४१ रणांचे टार्गेट आहे. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या.

पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना दबावाखाली ठेवले होते.

या दोघांची १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. विराट ६३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला. त्यानं डाव गडगडला. आता ऑस्ट्रेलियाची बॅटिंग असून भारतीय गोलंदाजांनी कमाल केली तर भारत विजयी होईल यात शंका नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...

जय-वीरूसारख्या जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचल! दोघांनीही केली आत्महत्या, शहरात खळबळ, कारण काय?

Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर...

उपमुख्यमंत्री अजित दादांच्या शिलेदारांनी फोन फिरवला; मोठा प्रश्न सुटला? नागरिकांनी मानले आभार? शहरात कुणाच्या नावाची चर्चा…

Politics News : कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे...