spot_img
देशसगळे आऊट ! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची स्थिती बिकट, पहा किती रन..आता...

सगळे आऊट ! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची स्थिती बिकट, पहा किती रन..आता गोलंदाजांच्या हातात मदार

spot_img

नगर सह्याद्री / गुजरात : सध्या भारत ऑस्ट्रेलिया फायनलसुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व गाजवले. नाणेफेक जिंकल्यावर पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

परंतु भारताची दैना झाली. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी टीम इंडियाची लाज वाचवली.भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियापुढे आता २४१ रणांचे टार्गेट आहे. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या.

पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना दबावाखाली ठेवले होते.

या दोघांची १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. विराट ६३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला. त्यानं डाव गडगडला. आता ऑस्ट्रेलियाची बॅटिंग असून भारतीय गोलंदाजांनी कमाल केली तर भारत विजयी होईल यात शंका नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नवीन आर्थिक वर्षात नगरकरांच्या खिशाला कात्री; पाणी पट्टीबाबत महापालिकेने केले स्पष्ट

  पाणीपट्टीच्या नवीन मागणीसह थकबाकीसाठी अंदाजपत्रकात तरतूद / नवीन आर्थिक वर्षापासून नवीन दराने पाणीपट्टीची आकारणी...

शिक्षिकेवर अत्याचार!; पोलीस निरीक्षक आरोपीच्या पिंजऱ्यात, जिवंत मारण्याचाही प्रयत्न, कुठे घडला प्रकार

पोलीस निरीक्षक आरोपीच्या पिंजऱ्यात | शिक्षिकेला मानसोपचाराच्या नावाखाली जिवंत मारण्याचाही प्रयत्न पारनेर | नगर सह्याद्री जालना...

पाणी पुरवठा योजनेची वीज तोडणार? महावितरण कंपनीने दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री वारंवार नोटीसा देऊन, पाठपुरावा करूनही महापालिकेने पाणी पुरवठ्याची वीज बिले...

शेतकऱ्यांना खुशखबर; ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार २५५५ कोटी, मंत्री कोकाटे काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय...