spot_img
देशसगळे आऊट ! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची स्थिती बिकट, पहा किती रन..आता...

सगळे आऊट ! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची स्थिती बिकट, पहा किती रन..आता गोलंदाजांच्या हातात मदार

spot_img

नगर सह्याद्री / गुजरात : सध्या भारत ऑस्ट्रेलिया फायनलसुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व गाजवले. नाणेफेक जिंकल्यावर पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

परंतु भारताची दैना झाली. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी टीम इंडियाची लाज वाचवली.भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियापुढे आता २४१ रणांचे टार्गेट आहे. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या.

पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना दबावाखाली ठेवले होते.

या दोघांची १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. विराट ६३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला. त्यानं डाव गडगडला. आता ऑस्ट्रेलियाची बॅटिंग असून भारतीय गोलंदाजांनी कमाल केली तर भारत विजयी होईल यात शंका नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...

नगर शहरात चाललंय काय?, अल्पवयीन मुलाचा खुनाचा केला प्रयत्न, वाचा, नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या...

राममंदिराच्या शिखरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अयोध्या | नगर सह्याद्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर...