spot_img
अहमदनगरओबीसींचा घात करणार येवल्याचा 'अलिबाबा'; मनोज जरांगे पाटलांचा मंत्री भुजबळांवर हल्लाबोल

ओबीसींचा घात करणार येवल्याचा ‘अलिबाबा’; मनोज जरांगे पाटलांचा मंत्री भुजबळांवर हल्लाबोल

spot_img

जालना | नगर सह्याद्री
हैदराबाद गॅजेटनुसार मराठा आरक्षणासाठी असलेला जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार ओबीसीला पाठिंबा देत मोर्चा काढत आहेत. मात्र हा मोर्चा खऱ्या अर्थान ओबीसीचा नसून, काँग्रेससाठी रचलेला आहे. ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसला मोठे करण्याचे काम सुरू असून, ते राजकारणात स्वतःला सेटल करत आहेत, असा जोरदार टोला मनोज जरांगे यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. हे सर्व राहुल गांधींच्या सांगण्यावरून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काही दिवसांपूव मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस जीआर रद्द करण्याच्या मुद्द्यावर जरांगे म्हणाले, मराठ्यांना नियमात असून देखील संघर्ष करावा लागत आहे. सगळे पुरावे असताना आम्हाला त्रास दिला जातो. दबावात जीआर निघत नाही आणि रद्द ही होत नाही. संविधानाच्या सर्व चौकटीत राहून काम करावे लागते. 10 तारखेला निघणाऱ्या काँग्रेसच्या मोर्च्यांना समजून घ्या.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यातील धनगर, बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यावर जरांगे पाटील बोलले. धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, बंजारा समाज असेल, यांनी एकत्र बसून समज-गैरसमज दूर करणं गरजेच आहे. जर बंजारा समाजाच्या नोंदी असतील, तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न कराव हे माझं मत आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, जरांगेंना एके47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला जरांगे यांनी प्रतिउत्तर देत म्हटलं आहे. ओबीसीत 374 जाती आहेत, सगळं तुम्हालाच पाहिजे का? या वडेट्टीवार साहेबांच्या वक्तव्याचा ओबीसींनी विचार करणं गरजेच आहे. ओबीसींना आमच मराठ्यांच 16 टक्के आरक्षण काढून खोटं आणि बोगस आरक्षण दिलं.

ओबीसींचा खरा घात कोणी केला असेल, तर येवल्याच्या अलिबाबांनी आणि काँग्रेसच्या पूवच्या नेत्यांनी. त्यांना माहित होतं, 14 टक्के आरक्षण मंडल कमिशनने ओबीसींना दिल आहे. 16 टक्के आरक्षण मराठ्यांच आहे हे माहित असताना सुद्धा दिलं. ओबीसींची खरी फसवणूक, वाटोळं कोणी केलं असेल, तर ओबीसी नेत्यांनीच केल आहे. हे सगळं राहुल गांधींच्या सांगण्यावरून केले जात आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर खा. निलेश लंके बोलते झाले, म्हणाले ‌‘सिस्पे‌’त गडबडच!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री श्रीगोंदा, पारनेरसह संपूर्ण नगर आणि पुणे जिल्ह्यातील गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील...

‘लग्न कर नाहीतर गोळी घालीन’; सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या तरुणाचा धक्कादायक कारनामा, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या तरुणाने तरुणीचा...

नगरच्या ‘या’ शिवारात थरार! गोरक्षकावर जीवघेणा वार; ट्रक अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर तालुक्यात गोवंश तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, गोरक्षकाच्या...

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा; कोणी केली मागणी?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि येऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी...